Sunday, July 20, 2025

Sahaj Vichar

"कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी..."

कविता प्रसिद्ध मराठी कवी श्री. ना. धों. महानोर यांची आहे, या ओळीत कवी आपल्याला सांगतात की आपण देवाची शोधाशोध मंदिरांमध्ये, तीर्थक्षेत्रांमध्ये करतो. पण खरा देव आपल्या अंतःकरणात आहे. आपण बाहेर शोधत राहतो पण अंतर्मनातील भगवंत उपाशी राहतो.

जेव्हा विश्व शून्य होते, निर्विचार होते, क्षणात 
नगण्य सूर्य, चंद्र, ग्रह, पाणी, समुद्र निर्माण झाले. हे सर्व निर्माण करणारी शक्ती किती मोठी असेल किती उदार असेल. अशा शक्तीला अजाण मनुष्य पैसे, नैवद्य, पूजा अर्पण करून पावन करण्याचा निरर्थक प्रयत्न करतो. 
अशा शक्तीबद्दल जाणतेपने निर्विचार ध्यानातून कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच "सहजयोग".

.
माणसाने बनवलेल्या...
दगडात देव नाही,
मूर्तीमध्ये देव नाही,
फोटोमध्ये देव नाही, 
तो तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्यात आहे,
अनुभवण्यासाठी ध्यानाला बसा,
तुमच्यातला देव, 
नंतर दिवसभर इतरांना अनुभवता येईल.... आणि तुम्ही देवमाणूस म्हणून गणले जाल. 
(प्रमाण - सर्व संत हेच सांगत आलेले आहेत)


"In every lifetime, the soul takes birth in different forms. In one life, it may be born as a Hindu, in another as a Muslim, and in another as a Christian. Therefore, instead of getting entangled in religious rigidity, if we see each individual as a soul, true communal harmony awakens. Through this awareness, and with the help of Sahaja Yoga, liberation (moksha) becomes possible."


देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥

जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।
जसे दुग्धा मध्ये लोनी, तसा देही चक्रपाणी ॥

देव देहात देहात, का हो जाता देवलात ।
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥

"मग आपण आपले मंदिर कसे ठेवले पाहिजे?"

सहजयोग, तुम्हाला तुमच्यातल्या मंदिरातील देवाशी जोडण्याचा उत्तम मार्ग दाखवेल.

*जय श्री माताजी*


करोडो वर्षापासून पृथ्वीवर सगळेकाही सुरळीत चालू आहे, म्हणजेच कुठेतरी, कोणीतरी नियोजन व काळजी करत आहे. त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणजेच सहजयोग.

परमेश्वराने मानवाच्या उत्क्रांतीसाठी विविध अवतार घेतले. परंतु मानवाने अवतारांचे (वागण्याच्या पद्धतीचे) रूपांतर धर्मात (जगण्याच्या पद्धतीत) केले.

तुम्ही चांगले वागा, असे सांगण्या एवजी तुम्ही असेच जगा, तरच धर्म टिकेल असे जगजाहीर केले

Sunday, June 1, 2025

*"तण देईल धन – एक हरवलेलं नातं"* ऋषिकेश औताडे, मधमाशी पालक, गोदागिरी फार्म, श्रीरामपूर

तण देईल धनएक हरवलेलं नातं

ऋषिकेश औताडे, मधमाशी पालक, गोदागिरी फार्म, श्रीरामपूर

मोबा. ९९६०५५३४०७

इमेल: godagirifarms@gmail.com

पावसाचा पहिला सडा पडतो, आणि एक वेगळीच जादू जमिनीवर उलगडू लागते. मातीवर हिरवळ फुलते. ओलसर मातीचा सुवास, गवतावर साचलेले दवबिंदू, आणि त्या गवतात डोलणारी रानफुलंहे सगळं किती तरी सुखावणार असतं. पण आपण फारसं लक्ष देत नाही. आपल्या नजरेला हे सगळंतणवाटतं.

गवत उगवतं, झाडझुडपं पानं टाकतात, बांधाच्या कडेने रानफुलं फुलतातआणि ते पाहिलं की लगेच हातात खुरपे घेतलं जातं, तणनाशकाची बाटली उघडली जाते. फार काळजीपूर्वक आपल्या शेतातलं, अंगणातलं "तण" काढूनस्वच्छपणराखल जात.

पण यात आपण नकळत एक अतिशय महत्त्वाचं नातं तोडतो ते म्हणजे मधमाश्यांशी असलेलं आपलं नातं.
पावसाळा आला की झाडांना फुलं येणं थांबतं. मोठ्या झाडांवर सध्या फुलं फारशी नसतात. आणि मधमाश्यांसाठी हीच मोठी अडचण असते. त्यांचं अन्नच गायब झालेलं असतं.  पावसामुळे फुलामधील पराग व मकरंद अक्षरश धुवून टाकला जातो. पण निसर्गात एक अद्भुत गोष्ट घडतेगवत, रानवेली, झुडुपं... ही सगळी लहानसहान झाडं पहिल्या पावसातच फुलायला लागतात. त्यांच्यावर छोटी, टवटवीत फुलं येतात.

ही फुलं मधमाश्यांसाठी वरदान ठरतात. अगदी पहिल्या पावसातच त्या फुलांवर मधमाश्या दिसू लागतात. गुंजारव करत, हलक्या आवाजात त्या फुलांभोवती फिरतात. त्याच फुलांवर त्या २-३ महिने जगतात. त्यांचं घर, अन्न, आयुष्यसगळं त्या गवतावर, त्या रानफुलांवर आधारलेलं असतं.

पण आपण तेच गवततणसमजतो. फवारणी करतो. फुलं येण्याआधीच त्यांचा नायनाट करतो. आणि नंतर म्हणतो, “शेतात मधमाश्या येत नाहीत, पोळी दिसत नाहीत

कधी विचार केलाय का, लहानपणी झाडांवर, छपरांवर, जुन्या माठांमध्ये, जमिनीला पडलेल्या भेगा मध्ये  मधमाश्यांची पोळी दिसायची... आता का दिसत नाहीत? कारण आपणच त्यांच्या जगण्याचा आधार कापून टाकलाय.

आज अनेक शेतकरी सांगतात, “फळं फुलत नाहीत, उत्पादन कमी होतंय.” त्यात एक मोठा हात असतो मधमाश्यांचा. पण त्या दिसेनाशा होतात, तेव्हा निसर्गाचं काम कोणी करायचं?

तुम्ही जर मधमाश्यांना मदत केली, त्यांच्या अन्नासाठी गवत, रानफुलं ठेवली, फवारणी थांबवलीतर त्या तुमच्यासाठी परत येतील. तुमचं परागीकरण करतील. फुलांना फळं देतील. तुमचं उत्पादन वाढवतील.

शेती म्हणजे नुसती माती, पाणी, औजारे , खते  आणि बियाणं नाही. ती एक सजीव व्यवस्था आहेजिथं झाडं, गवत, फुलं, कीटक, पक्षी सगळे मिळून जगतात. आपण जर या साखळीतील एक दुवा तोडलात, तर सगळा निसर्ग कोसळतो.

मधमाशी ही फक्त मध देणारी कीटक नाहीती तुमच्या शेताची कृषिलक्ष्मी  आहे. आणि तिचं अन्न म्हणजे हेचतणसमजलेलं गवत आहे.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला गवत दिसेल, तेव्हा क्षणभर थांबा. पाहा, त्या गवतावर फुलं येत आहेत का? मधमाशी भिरभिरतेय का? एकदा का ते दिसलं, की तुम्हाला समजेलगवत काढण्यापेक्षा ते जपणं किती महत्त्वाचं आहे.

शेवटी, मधमाश्या जर उपाशी राहिल्या, तर निसर्गही उपाशी राहील. पण तुम्ही त्यांना फुलं दिलीत, तर त्या तुमच्या हातात सोनं ठेवून जातील.

आज “तणनाशक” वापरणं म्हणजे आधुनिक शेतीचं एक मानक तंत्र बनलं आहे. पण हे रसायन केवळ तणच नष्ट करत नाही, तर जमिनीतील सूक्ष्मजीवजगतावरही गंभीर परिणाम करते. जमिनीतील बुरशी, जिवाणू, गोगलगाय, गांडुळं – ही सगळी सूक्ष्म साखळी उध्वस्त होते. परिणामी, जमिनीची रचना ढासळते, सुपीकता कमी होते, पाणी धारण करण्याची क्षमता घटते, आणि जमिनीची धूप वाढते.

अशा तणनाशकांमुळे काही देशी रानझाडं, गवत पूर्णतः नामशेष झाली आहेत – ज्या वनस्पती कधीकाळी मधमाश्यांसह अनेक पक्षी व प्राणी यांचं अन्न होत्या. काही तणांना औषधी गुणधर्म आहेत. उदा. तिळवण, भेंडी, अडुळसा यांसारख्या रानवेली अनेक आजारांवर उपयुक्त ठरतात. गायी, शेळ्या, म्हशींसाठीही ही रानफुलं, गवत, तणं हे एक उत्तम पोषणमूल्य असलेलं खाद्य आहे – जे त्यांच्या दुधातही फरक घडवते.
हे तण म्हणजे निसर्गाचा समतोल राखणाऱ्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे.

थोडक्यात काय तर..."गवत सांभाळा, मधमाश्या होतील गोळा व "गवत राखाल, तरच मध चाखाल"


 

महाराष्ट्रात आढळणाऱ्या सामान्य गवतांची उदाहरणेमधमाश्यांसाठी उपयुक्त फुलं देणारी:

गवत/वनस्पतीचे नाव (स्थानिक)

शास्त्रीय नाव

वैशिष्ट्य

अधिक माहिती

दुर्वा / कुसळी

Cynodon dactylon

लहानसे फुलं; जमिनीवर पसरणारं

मुरडशेवाळ

Celosia argentea

गुलाबी-पांढऱ्या फुलांचे तण

टंचा / कवडस/ एकदांडी

Tridax procumbens

मधमाश्यांसाठी आकर्षक पिवळसर फुलं

घाणेरी

Lantana camara

मधमाश्यांना आवडते फूल

भुईआवळी

Alysicarpus vaginalis

लहान रानवेली; पाणथळ जमिनीत फुलते

रान अंबाडी

Hibiscus cannabinus

मोठी फुलं; मधमाश्यांचे आकर्षण

नाचणी गवत

Eleusine indica

साधारण गवत, फुलण्याच्या काळात उपयुक्त

साटरवा / खिरा

Corchorus capsularis

रानभाजी म्हणून वापरले जाणारे झुडूप

पिवळा भंगरा

Sphagneticola calendulacae

जमिनीलगत पसरणारी पिवळी फुले

पिवळी तीळवणी

Cleome viscosa

पिवळी फुले मधमाश्यांना आकर्षित करतात

मेंढा दुधी / उतरण

Pergularia Deamia

आग्या मधमाशी खूप आकर्षित होते

 

काटेरी राजगीर

 

Amaranthus Spinosus

फुलोरी व डंखरहित मधमाशी खूप आकर्षित होते

https://www.flowersofindia.net/catalog/qrc/Prickly%20Amaranth.png

पटवट्या घास

Calyptocarpus vialis

पिवळी छोटी फुले

चांदणी

Jatropha gossypifolia

लाल फुले, डंखरहित मधमाशी आकर्षित होते

जंगली तुळस

Croton bonplandianus

पांढरी फुले गुच्छ स्वरूपात

तरवड

Senna auriculata

मधमाशांसाठी पराग व मकरंद देणारी उपयुक्त

टंटणी

Abutilon indicum

मधमाशांसाठी पराग व मकरंद देणारी उपयुक्त औषधी वनस्पती आहे.

जंगली झेंडू

Malvastrum coromandelianum

मधमाशांसाठी पराग स्रोत असलेली उपयुक्त जंगली फुलझाडे वनस्पती आहे

करटूली

Momoridca charanita

मधमाशांसाठी परागसंपन्न फुले देणारी औषधी व उपयोगी वनस्पती आहे.

 


Sahaj Vichar

"कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी..." कविता प्रसिद्ध मराठी कवी श्री. ना. धों. महानोर य...